विसापूर येथील शहीद सुभेदार श्रीरंग सावंत यांचे शौर्य चक्र पदक सैन्यदलाच्या बॉम्बे सॅपर्सच्या म्युझियमला सुपूर्द.
विसापूर येथील शहीद सुभेदार श्रीरंग सावंत यांचे शौर्य चक्र पदक सैन्यदलाच्या बॉम्बे सॅपर्सच्या म्युझियमला सुपूर्द. पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम. विसापूर .ता. खटाव येथील स्व.सुबेदार श्रीरंग तात्याबा सावंत, शौर्य चक्र, ( 269 ER ) बॉम्बे इंजिनीअर ग्रुप ( पुणे ) मूळ गाव. विसापूर. ता. खटाव. जि. सातारा. यांना भारताच्या राष्ट्रपतीकडुन मानाचे शौर्य चक्र पदक मिळाले होते. त्यांनी भारतीय सेनेत कार्यरत असताना जिल्हा कोटा राजस्थान येथे जुलै 1986 अतिवृष्टी पाऊस आणि पूरग्रस्त जनतेला वाचवून सुरक्षित स्थळी पोहचवण्यासाठी सैनिकी मदत कार्यात उल्लेखनीय साहस करून देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले. भारताच्या राष्ट्रपतीनी त्यांना एप्रिल 1988 मध्ये मरणोपरांत "शौर्य चक्र " बहाल करून गौरव केला. महाराष्ट्र सरकारने मे 1990 मध्ये " त्याना महाराष्ट्र गौरव पुरस्कार " देऊन सन्मानित केले. 31 जानेवारी रोजी तेच शौर्य चक्र पदक ( मेडल ) भारतीय सेना प्रमुख जनरल मनोज पांडे COAS आणि बॉम्बे इंजिनीअर ग्रुप चे कर्नल कमाडंट यांच्याकडे शहीद सुभेदार श्रीरंग सावंत यांचे...