सौ. अश्विनी धनाजी देशमुख यांची मोजे जायगाव ग्रामपंचायत सरपंच पदी निवड.
औंध प्रतिनिधी, नवनाथ देशमुख.
मौजे जायगांव ग्रामपंचायत मध्ये ठरल्याप्रमाणे कै. भानुदास आण्णा व सौ सुनंदाताई राऊत माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्या मागदर्शना खाली आज सौ. आश्विनी धनाजी देशमुख यांची ६ विरुद्ध ३ अशि सरपंच पदी निवड झाली असून निवडी दरम्यान मंडल अधिकारी श्री जाधव साहेब. गावकामगार तलाठी कांबळे साहेब.ग्रामसेवक सस्ते यांच्या उपस्थितीमध्ये सरपंच पदाची निवड करण्यात आली. यावेळी सरपंच सौ. अश्विनी धनाजी देशमुख यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. सदर निवड कार्यक्रम पसंगी जायगाव येथील अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्तितीत होते.
Comments
Post a Comment